अवघ्या सहा दिवसांत सात कोटी भाविकांचे 'संगम स्नान'

    17-Jan-2025
Total Views | 65

Mahakumbh 2025

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh Pavitra Snan Update) 
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारीपासून अध्यात्माचा भव्य महोत्सव 'महाकुंभ'ला सुरुवात झाली. देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात आले असून त्रिवेणी संगमात स्नान करण्याता अनुभव घेत आहेत. महाकुंभच्या पहिल्या दिवशी साधारण एक कोटीहून अधिक भाविकांना स्नान केल्याची माहिती होती. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी नागा साधूंसह साधारण ३.५० कोटी भाविकांनी पहिले अमृत स्नान केले. मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभ सुरु झाल्यापासून दि. १६ जानेवारीपर्यंत अवघ्या सहा दिवसांत तब्बल सात कोटींहून अधिक लोकांनी संगम आणि इतर घाटांवर पवित्र स्नान केले आहे. तरी महाकुंभात ४५ कोटींहून अधिक लोक पवित्र स्नान करतील असा अंदाज आहे.

हे वाचलंत का? : प्लास्टिकमुक्त समाज घडवण्यासाठी एकत्र या!

महाकुंभाच्या पहिल्या दिवशी पौष पौर्णिमानिमित्त १.७० कोटी लोकांनी स्नान केल्याची विक्रमी नोंद झाली होती. दुसऱ्या दिवशी, मकरसंक्रांती अमृतस्नानानिमित्त ३.५० कोटी लोकांनी अमृत स्नान केल्याची नोंद आहे. अशाप्रकारे महाकुंभाच्या पहिल्या दोन दिवसांत ५.२० कोटींहून अधिक लोकांनी श्रद्धेने स्नान केले. याशिवाय १५ जानेवारीला महाकुंभाच्या तिसऱ्या दिवशी ४० लाख लोकांनी स्नान केले. गुरुवारीही ३० लाखांहून अधिक लोकांनी संगमात पवित्र स्नान केले. हा महाकुंभ संपूर्ण जगाला एकता, सौहार्द आणि मानवतेचा मोठा संदेश देत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121