बहुचर्चित ‘अखिल महाराष्ट्र भाट समाजा’चे दोन दिवसीय दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन आणि वधु-वर परिचय मेळावा श्री क्षेत्र शेगाव, बुलढाणा येथे नुकतेच अतिशय थाटामाटात संपन्न झाले. या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील ज्ञातीबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू धर्माचा वारसा जगणार्या आणि जपणार्या भाट समाजाच्या या अधिवेशनाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
बहुचर्चित ‘अखिल महाराष्ट्र भाट समाजा’चे दोन दिवसीय दुसर्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे प्रमुख अतिथी ‘सर्व भाट राव ऑल इंडिया फाऊंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष राम प्रताप भाट आणि ‘राष्ट्रीय मातृशक्ती’ राष्ट्रीय अध्यक्ष निर्मला राव या होत्या. सर्व कार्यक्रमाचे सुमधुर निवेदन केले ते वैशाली बाविस्कर आणि संतोष शिंदे यांनी. दि. १० जानेवारीला सायंकाळी महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम प्रसन्न वातावरणात पार पडला. यावेळी केशवराव दशमुखे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या विचारांची सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. विनायक सूर्यवंशी, प्रा. सुरेश डोंगे, विनोद दशमुखे, आप्पा बाविस्कर यांच्याकडून भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर भाट समाजातील गुणवंत, प्रज्ञावंत मातृशक्तीने आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
दुसर्या दिवशी दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता भक्तनिवास ‘श्री गजानन महाराज संस्थान’ ते कार्यक्रम स्थळापर्यंत सर्व भाट समाजातील बंधू-भगिनींनी विराट स्वरुपाची पायी दिंडी काढली. दिंडीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मूर्ती पालखीत विराजमान करून त्यावर मान्यवरांनी पुष्पवृष्टी केली होती. दिंडीत पायी चालत असताना समाजबांधवांनी राष्ट्रसंतांचे भजन-गायन करून वातावरण अधिकच प्रसन्न केले. त्याचप्रमाणे, सर्वांनी एका स्वरात ‘एक भाट-लाख भाट’, ‘राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘चंद्रवरदायि की जय’ यांसारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमले. दिंडीत आबालवृद्धांसह तरुणांचा प्रचंड सहभाग होता. शेवटी कार्यक्रमस्थळी भाट समाज दिंडीचे आणि पालखीचे भव्य स्वागत झाले.
पुढे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, उद्घाटन आणि सामुदायिक पार्थना तितक्याच तन्मयतेने पार पडली. या सगळ्यात सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे मंचावर वंशावळी घेऊन बसलेले शिवाजीराव व्यंकटराव नवले भाट. कारण त्यांच्यासमोर भाट समाजाच्या संस्कृतीचे प्रतीक मोडी भाषेतील वंशावळी चौरंगावर ठेवली होती आणि ती वंशावळी आणि वंशलेखक विशेष लक्षवेधी ठरलेत. वंशावळी लेखक यांनी वंशावळीच्या माध्यमातून वंशावळी वाचकांची संस्कृती, वंशावळी लेखकांचे महत्त्व विशद केले. तसेच अनेक मान्यवरांचे वंशावळीसंबंधी गुंतागुंतीच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांनी सहज दिली. त्यांना मोलाचे सहकार्य अर्जुन नवले भाट यांचे लाभले.वंशावळीपूजन झाल्यानंतर खर्या अर्थाने कार्यक्रमास रंजकता आली. तसेच विनोद दशमुखे यांनी उपलब्ध करून दिलेली भाट समाजाची आकर्षक स्मरणिका, भाट समाजाचे लेखक प्रणव भाट यांच्या ‘जिंकेपर्यंत लढा यश तुमचंच आहे’ या पुस्तकाचे आणि वृत्तपत्राचे अन् भाट समाजाचे दिनदर्शिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.सन्मानित अतिथींनी महाराष्ट्रभरातून समाजबांधवांना संबोधित करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या हिंदी भाषणातून समाजएकतेची, भाट समाज संघटनाची गरज, भाट समाजातील ऐतिहासिक युगपुरुषांची ओळख, वर्तमानामधील भाट समाजाची भविष्यातील वाटचाल, इतिहासातील भाट समाजातील योगदान अशा विविध विषयांवर ते व्यक्त झालेत. विनायक सूर्यवंशी यांनीही आपली आरक्षणाची लढाई आयोगापर्यंत कशी नेली, समाज संघटन करण्यातील अडचणी किंवा भविष्यातील भाट समाज संघटनाची वाटचाल यांविषयी थोडक्यात पण महत्त्वाची मते व्यक्त केली. त्यांनी समाजासाठी केलेला संघर्ष उपस्थित भाट समाजापर्यंत योग्य शब्दांत पोहोचवला. त्यांच्या शब्दांचे माधुर्य, ओजस्विता आणि विषय मांडण्याची कला मला, माझ्यासह उपस्थित समाजबांधवांना विलक्षण आवडली.
दुपार नंतरच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांचा एकत्रित शाल, ग्रामगीता आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे वंशावळी लेखकांचा शाल, ग्रामगीता आणि मानाचे स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आजवर त्यांनी केलेल्या कार्याचा असा सन्मान मिळून ते सर्व सन्मानित वंशावळी लेखक मुखावर हर्षे श्रीमंती घेऊन धन्य झाले.
दुपारी २-३ वाजण्याच्या सुमारास इच्छुक मुलामुलींच्या वधु-वर परिचयाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. मंचावर एका रांगेत बसून विवाहेच्छुकांनी आपापला परिचय ठळक आवाजात आणि थोडक्यात करून दिला. खेळीमेळीच्या वातावरणात वधु-वर परिचय मेळावासुद्धा पार पडला. शेवटी समारोप भाषण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हे भव्यदिव्य अधिवेशन संपन्न करण्यामध्ये समाजातील सर्व बांधवांनी आपापल्यापरीने खारीचा वाटा उचलला होता. कोणतेही सामाजिक कार्य हे समाजाचा हातभार लावल्याशिवाय पूर्ण होत नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हीच अनुभूती यावेळेस ‘याची देहि याचि डोळा’ अनुभवली. कुणाला असाही प्रश्न पडला असेल की, अशा मेळाव्यातून काय साधले जाते? त्यांना एका वाक्यात उत्तर देऊ इच्छितो की, ती म्हणजे सामाजिक एकता आणि याच सामाजिक एकतेची आज गरज आहे. आजकाल एक व्यक्ती ‘एकटा जीव सदाशिव’प्रमाणे जगूच शकत नाही. सुरक्षितपणे प्रगती, विकास करण्यासाठी व्यक्तीसोबत त्याच्या समाजाची ताकद असणे खूप गरजेचे आहे.
सामाजिक एकता, समाज संघटन फार महत्त्वाचे आहे . या सर्व अधिवेशनात विशेष सहकार्य विनायक सूर्यवंशी, अरविंद शिंदे, दिपक साळवी, ज्योती निचड, योगेश नवले, राहुल चोपडे, अर्चना साळवी, विनोद दशमुखे, सुनिल चव्हाण, आप्पा बाविस्कर, सुशिला लाडस, यशवंतराव जगताप, गजानन जगताप, सुनिल सूर्यवंशी, अभिजित भाट, वैशाली बाविस्कर, संतोष शिंदे, शारदा सूर्यवंशी, संजय भाट, मधुकर पुजारी, गजानन जगताप, प्रमोद बाविस्कर, सुधाकर पुजारी, संदिप नवले, जयवंत पवार, सुनील सिरसाट, गजानन राजभाट, दीपक क्षीरसागर, कैलास सोनोने अशा अगणित समाजबांधवांनी या भाट समाजाच्या अधिवेशन सेतू उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इथे सर्वच समाजबांधवांची नावे घेऊ शकत नाही. कारण लेखनाची काही बंधने असतात. म्हणून कृपया कोणीही गैरसमज करू नये.
जिल्हा कार्यकारिणीचे योगदान तर खूपच उल्लेखनीय होते. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, वर्धा, अकोला, बुलढाणा, कोल्हापूर, जळगाव, ठाणे-पालघर, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील भाट समाजाच्या सदस्यांनी कार्यकारिणीचे पदाधिकारी नसतानासुद्धा मोलाचे योगदान दिले.संजय, वीरशिरोमणी चंद्रवरदायी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सर्व समाजबांधवांच्या एकत्रित सहकार्याने संतश्रेष्ठ गजानन नगरी शेगांव, बुलढाणा इथे अशा तर्हेने अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे अधिवेशन संपन्न झाले.
विशाल नवले
(लेखक भाट समाजाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आहेत.)
८७८८६७६४५१