"...तर कट्टरपंथींना पाकिस्तानात जाऊन राहावे लागेल", शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे वक्तव्य
13-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या भाषेत एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखती दरम्यान सुनावले आहे. भारतात राहणाऱ्या कट्टरपंथींनी पाकिस्तानात स्थलांतरण करून वास्तव्य करावे. या कट्टरपंथी मुस्लिमांच्या मागणीमुळेच भारत देशाची फाळणी झाली असल्याचे भाष्य त्यांनी एका मुलाखती दरम्यान केले होते.
ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलत असताना त्यांनी कट्टरपंथी मुस्लिमांना आरसा दाखवला आहे. ते म्हणाले की, हिंदूंसोबत एकाच देशात राहू इच्छित नसलेल्या मुस्लिमांच्या मागणीवरून भारताची धर्माच्या आधारावरच भारताची फाळणी करण्यात आली होती. म्हणून आता सर्व मुस्लिमांनी ज्या देशामध्ये हिंदूंपासून दूर राहण्याची मागणी केली असून त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावे असेही सांगितले.
हिंदू कधीही म्हणत नाहीत की ते मुस्लिमांसोबत सबअस्तित्वात राहू शकत नाहीत. ते पुढे म्हणाले की, देशाची झालेली फाळणी दुरूस्त व्हावी आणि जर तसे झाल्यास भारत देशात राहणाऱ्या सर्व कट्टरपंथी मुस्लिमांना पाकिस्तानात जाऊन राहावे लागेल.