नावीन्यपूर्ण प्रयोग केला नाही तर राजकारणात टिकणार कसे?

उबाठा गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया

    11-Jan-2025
Total Views | 45
 
Uday Samant
 
मुंबई : उबाठा गटाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला नाही तर राजकारणात टिकणार कसे? अशी प्रतिक्रिया उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उबाठा गटाने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "यामध्ये काही नावीन्यपूर्ण आहे असे मला वाटत नाही. लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पण विधानसभेला देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली तो फुगा आम्ही फोडला. आता खरी कसोटी आहे. उबाठा स्वतंत्र लढत असताना मुस्लीम बांधव आणि भगिनी त्यांना मतदान करणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. काँग्रेसला वाटते की, ती वोटबँक आमची आहे आणि उबाठालाही ती वोटबँक आमची आहे, असे वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांची आता कसोटी आहे."
 
हे वाचलंत का? -  जन्म दाखला घोटाळ्याची पाळेमुळे अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यापर्यंत!
 
"त्यांच्यात काय चालले आहे, हे जसे तुम्हाला कळत नाही, तसेच ते महाराष्ट्रातील मतदारांनासुद्धा कळत नाही. २०१९ ला जनमत मिळाले असताना काँग्रेससोबत जाणे. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणे. भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही, असे वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते. त्या काँग्रेसचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्दयसम्राट हा शब्दप्रयोग न करणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय त्यांनी घेतला असेल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "पक्ष टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा असेल, तर नावीन्यपूर्ण प्रयोग करणे त्यांचा प्राधान्यक्रम आहे. हे नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले नाही तर राजकारणात टिकणार कसे? त्यांची काल-परवाची भूमिका आणि आजची भूमिका यातून त्यांच्यात प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचा नेता जनतेसमोर गेला, तर तोसुद्धा राजकारणात विक्रमी घडामोडी करु शकतो, हे एकनाथ शिंदे साहेबांनी शक्य करून दाखवले. त्यामुळे राजकारणात कधीही कोणाला कमी लेखू नये," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121