"काँग्रेस आणि पवारांसोबत जाऊन वसुलीचे डोहाळे..."; केशव उपाध्येंचा राऊतांवर घणाघात

    27-Sep-2024
Total Views | 73
 
Raut
 
मुंबई : काँग्रेस आणि पवारांसोबत जाऊन वसुलीचे डोहाळे पुरवून घेतले, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली. यावर भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत जाऊन अडीच वर्षाची जुलमी सत्ता मिळवून स्वतःचे वसुलीचे डोहाळे पुरवून घेतले आणि ते बंद झाल्यावर आता मराठी माणूस आणि महाराष्ट्र दिसू लागलाय? एकदिवसा आड काँग्रेस नेत्यांकडे दिल्लीच्या फेऱ्या माराव्या लागतात, तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणूस नाही का दिसत?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "विचारधारा विकून सत्ता मिळवत महाराष्ट्राला लुटून बरबाद करण्याचे तुमचे डोहाळे भारतीय जनता पक्षाने उधळून लावल्याच्या परिणामतून आलेली ही भाषा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी नरेंद्रजी मोदी, अमित भाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार निरंतर काम करत राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121