जालना : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. दरम्यान, काहीही न खाल्ल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या ९ दिवसांपासून आरक्षण करणाऱ्या मनोज जरांगेंनी बुधवारी आपलं उपोषण सोडलं. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि मराठा आंदोलक महिलांच्या हाताने पाणी पित त्यांनी दुपारी ४ वाजता आपलं उपोषण सोडलं. "आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर २०२४ ला कशामुळे पाडापाडी झाली यासाठी माझ्या नावाने ओरडत बसू नका. माझा समाज मोठा करण्याची तुम्हाला संधी आहे. मराठा समाजाने राजकीय लोकांसाठी स्वत:च्या पोरांना धोका देऊ नये. स्वत:च्या पोरांना आरक्षण देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहा," असे ते यावेळी म्हणाले.