कोण आहेत वंचितचे पहिल्या यादीतील ११ उमेदवार?

    21-Sep-2024
Total Views | 45
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी एकीकडे महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली.
 
वंचित बहुजन आघाडीचे ११ उमेदवार पुढीलप्रमाणे :
 
रावेर - शमिभा पाटील
सिंदखेड राजा - सविता मुंढे
वाशिम - मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे - नीलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
साकोली - डॉ. अविनाश न्हाणे
नांदेड दक्षिण - फारुख अहमद
लोहा - शिवा नारंगळे
औरंगाबाद पूर्व - विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव - किसन चव्हाण
खानापूर - संग्राम कृष्णा माने
 
तसेच आम्ही लवकरच निवडणूकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा काढणार असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले की, "राजू शेट्टींना आम्ही सांगितलं की, वामनराव चटप राजुरामधून लढतात आणि गोंडवाना पार्टी देखील राजूरा मतदारसंघातून लढते. मागच्यावेळी गोंडवाना पार्टीच्या उमेदवाराला ४२ हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे वामनराव चटप जर दुसऱ्या मतदारसंघातून लढणार असतील तर आम्हाला विचार करता येईल. महाराष्ट्राच्या पक्षांबद्दल बोलण्यापेक्षा आपण प्रादेशिक पक्षांबद्दल बोललो तर बरं होईल, असं आम्ही राजू शेट्टींना सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना किती जागा हव्यात याची लिस्ट त्यांनी आम्हाला दिलेली आहे. बच्चू कडूंबरोबर आमचं जमू शकत नाही. हेसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं," अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअरइंडियाचे फ्लाइट नंबर एआय-१७१ हे विमान उड्डाणानंतर अवघ्या २ मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे निवासी भागात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अहमदाबादहून लंडनला निघालेल्या २४२ प्रवासी होते. यात २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक प्रवासी जखमी अवस्थेत मिळाला आहे. या २४२ प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या संपूर्ण दुर्घटनेबाबत जगभरातुन शोक व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे ..

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ४५ उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ६२ हजार १२५ मेगावॅट वीज निर्मिती, तर ९६ हजार १९० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबध्दरित्या गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121