राहुल गांधींची तळी उचलायला राऊत पुढे! आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरुन म्हणाले, "त्यांचं वक्तव्यं हे..."

    13-Sep-2024
Total Views | 67
 
Sanjay Raut
 
मुंबई : राहूल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. आता राहूल गांधींच्या वक्तव्याची सारवासारव करण्यासाठी आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत पुढे सरसावले आहेत. राहूल गांधींनी आरक्षण रद्द करू असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, "आरक्षणासंदर्भातील राहूल गांधींचं वक्तव्य भाजपने नेहमीप्रमाणे मोडून तोडून समोर आणलं आहे. आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहूल गांधींनी केल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. मी त्यांची पूर्ण मुलाखत ऐकली. भाजपला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. ते त्यांना हवं तितकंच ऐकतात आणि बाकीचं मोडून तोडून फेकून देतात," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  राहूल गांधी आरक्षणप्राप्त वंचितांची क्षमा मागणार का? पंकजा मुंडेंचा सवाल
 
"काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयी भूमिका काय आहे हेही मला माहिती आहे. जोपर्यंत समाजात विषमता आहे, समान न्यायाचे तत्व लागू होत नाही, दुर्बल समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण सुरु राहिल, अशी आमची भूमिका आहे," असे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, राहूल गांधींच्या वक्तव्याच्या विरोधात सध्या राज्यभरात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राहूल गांधींची पाठराखण करण्याकरिता विरोधी पक्षातील नेते पुढे सरसावले आहेत. अशातच आता संजय राऊतांनीही राहूल गांधींचं समर्थन करत भाजपवर टीका केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121