वंशविच्छेदामुळे बांगलादेशात हिंदू लोकसंख्येत घट

हिंदू लोकसंख्या ३० टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर

    09-Aug-2024
Total Views | 46
 
Bangladesh
 
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण?
 
बांगलादेशातील सत्तांतरादरम्यान तेथील हिंदूंवर अत्याचार करून वंशविच्छेद करण्यात येत आहे. त्याविषयी दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर इंटिग्रेटेड अ‍ॅण्ड होलिस्टिक स्टडीज’ (सीआयएचएस) या ‘थिंकटँक’तर्फे अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे या अहवालातील गंभीर बाबी ‘बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण’ या चार भागांच्या विशेष मालिकेतर्फे मांडण्यात येणार आहेत. बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येत होणारी घट आणि त्याची कारणे सांगणारा आजचा हा पहिला भाग. 
 
नवी दिल्ली : बांगलादेशात शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगविरोधात आंदोलन करून सत्तांतर घडविण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाआड मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तेथील हिंदू समाजाला लक्ष्य करून वंशविच्छेद करण्याचा जिहादी अजेंडा कायम ठेवला आहे. भारताची फाळणी झाल्यानंतर 1947 साली पूर्व बंगाल असताना आणि 1971 सालानंतर बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून धार्मिक अल्पसंख्याकांना, विशेषतः हिंदूंना पद्धतशीर दडपशाही आणि वंशविच्छेदाचा सामना करावा लागला आहे.
 
बांगलादेशातील हिंदूंचा होणारा छळ ही काही नवी घटना नाही. त्यास खरे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगालच्या फाळणीचे संदर्भ आहेत. ‘इस्लाम स्वीकारा, अथवा मृत्यू’ या तत्वानुसार कट्टरतावादी मुस्लीम कार्यरत असतात. सध्या बांगलादेशात त्याचाच प्रत्यय येत आहे. धार्मिक छळामुळे काही दशकांमध्ये हिंदू लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या प्रदेशात 1947 साली जवळपास 30 टक्के हिंदू लोकसंख्या होती. मात्र, आज हिंदूंची लोकसंख्या आठ टक्क्यांपेक्षाही कमी उरली आहे.
 
लोकसंख्येची आकडेवारी बघितल्यास बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येतील घट ही नैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदल नाही, तर दशकांच्या लक्ष्यित हिंसाचार, सक्तीचे धर्मांतर आणि राज्यसमर्थित भेदभाव यांचा परिणाम आहे. बांगलादेशमध्ये लोकशाही रुजू शकलेली नाही, राजकीय अस्थिरतेने बांगलादेशची पाठ सोडलेली नाही. मात्र, देशात राजकीय स्थैर्य असतानाही हिंदूंवर अत्याचार होतच आलेले आहेत.
 
उद्याच्या भागात वाचा : महिलांवरील बलात्काराचा वंशविच्छेदासाठी वापर
 
हिंदूंच्या वंशविच्छेदाचे ‘चितगाव मॉडेल’
चितगाव हा बांगलादेशातील एक महत्त्वाचा प्रदेश. चितगावमधील डोंगराळ भाग एकेकाळी 100 टक्के हिंदू होता. मात्र, या भागाने सर्वाधिक अत्याचार सहन केले आहेत. बांगलादेशातील 1997 सालच्या शांतता करारानुसार या भागात राहणार्‍या स्वदेशी नागरिकांचे (त्यात बांगलादेशी हिंदूही येतात) आणि त्यांच्या जमीनजुमल्यांचे संरक्षण करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या भागात नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लीम कट्टरतावादी गटांची घुसखोरी करविण्यात आली. त्यामुळे हिंदूंना विस्थापन, सक्तीचे धर्मांतर आणि प्राण गमवावे लागत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लोकप्रतिनिधींसाठी संघटन, संवाद, योग, समरसता, तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

लोकप्रतिनिधींसाठी संघटन, संवाद, योग, समरसता, तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी सर्व आवश्यक गुणांनी संपन्न असणे अत्यंत आवश्यक आहे! त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरापासून संसदेपर्यंत कोणत्याही पातळीवरील कामकाज लोकोपयोगी होऊ शकत नाही. एकविसाव्या शतकात घोडदौड करणाऱ्या भारताला हे अतिशय गरजेचे आहे. ही गरज ओळखून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी गेली चार दशके इतर अनेक समाजघटकांप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण देत आहे. गेले ३ दिवस छत्तीसगढमधील कुरूद विधानसभा क्षेत्रातील राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील उत्तनमधील ज्ञान नैपुण्य केंद्रात प्रशिक्षण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121