संजय राऊतांविरोधात महिलेचं ईडीला पत्र! जबाब बदलण्यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी

    31-Aug-2024
Total Views | 599
 
Sanjay Raut
 
मुंबई : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात एका महिलेने ईडीला पत्र लिहिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार डॉ. स्वप्ना पाटकर यांना त्याचा जबाब बदलण्यासाठी सतत बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
स्वप्ना पाटकर यांनी २८ ऑगस्ट रोजी ईडीला हे पत्र लिहिले आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या तपासादरम्यान दिलेला जबाब बदलण्यासाठी आपल्याला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
 
हे वाचलंत का? -  धक्कादायक माहिती! 'मविआ'च्या काळात लॉकडाऊनमध्येही दररोज १०९ महिलांवर अत्याचार
 
स्वप्ना पाटकर आपल्या पत्रात म्हणाल्या की, "मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, या प्रकरणातील आरोपी आणि त्याचे दलाल गुंड हे साक्षीदाराला सतत धमकावत आहेत. मला सतत धमक्या दिल्या जात आहेत आणि जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तपासादरम्यान दिलेल्या माझ्या जबाबानुसार, आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर काही जमिनी आणि मालमत्तेसाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे," असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121