"पुतळा तयार करणारा राहुल गांधींचा निकटवर्तीय!"

सुधीर मुनगंटीवार : पुतळ्यांसंदर्भात धोरण निर्मितीची गरज

    29-Aug-2024
Total Views | 190
 
Rahul Gandhi
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा राहुल गांधींचा निकटवर्तीय आहे, असे वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. तसेच पुतळ्यांसंदर्भात धोरण निर्मितीची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
 
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही निश्चितपणे दु:खदायक आणि चिंताजनक घटना आहे. परंतू, या घटनेचं राजकारण करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी चौकशीची मागणी केली. या चौकशी समितीत आमच्यापैकी काही सदस्य असावेत, असं विरोधी पक्षांना वाटलं तर त्यांना तशी मागणी करता येईल. पण फक्त आणि फक्त सत्तेसाठी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं योग्य नाही."
 
हे वाचलंत का? -  पुतळ्याचं सुशोभिकरण राजकारण करणाऱ्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून!
 
काँग्रेसकडून मुर्तीकार हा आरएसएसचा माणूस असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर मुनगंटीवार म्हणाले की, "पुतळा तयार करणारा हा राहुल गांधींचा माणूस आहे असं मला कळलं. त्यामुळे ही माहिती तपासावी लागेल. चौकशीमध्ये काय करावं यावर जास्त भर द्यायला हवं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण राजकारणाचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला तर हे दुर्दैव आहे. हे शिवभक्तांना मान्य नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "काही विषय हे राज्यात धोरण करून त्याची अंमलबजावणी करण्याचे विषय आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर महाविकास आघाडीला काय करावं हे सुचत नव्हतं. त्यामुळे आता ते या विषयाचं राजकारण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विषयात विरोधी पक्षाने एकही सूचना केली नाही. चौकशीचा अँगल कसा असावा, त्याची चौकट कशी असावी, चौकशीसाठी कोणत्या लोकांची नियूक्ती करावी, यावर ते कुणीच बोलत नाहीत. यातून काय निष्पन्न होतं? छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी संवेदनशील विषय नाही का?" असा सवाल त्यांनी केला.
 
"यासंदर्भात एक परिपूर्ण बांधकामाचं धोरण करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटतं. मुर्तीला मंजूरी देण्याचं धोरण हे या सरकारने केलेलं नाही. ते मागच्या सरकारमध्ये केलेलं आहे. या धोरणातील उणीवा सर्वांनी दूर करायला हवं. यावर राजकारण करणं अतिशय वाईट आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121