"शिवसेनेच्या जन्मापासूनच ठाकरेंनी..."; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

    28-Aug-2024
Total Views | 200
 
Rane & Thackeray
 
सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना उदरनिर्वाहाचं साधन बनवलं, असा घणाघात खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. बुधवारी महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.
 
नारायण राणे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना अतिशय दुर्दैवी घटना होती. आठ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. ऐन पावळ्यात हवामान खराब असल्याने हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा ज्यांनी बांधला त्यांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला याचं कारण बाहेर आणून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी जनतेची इच्छा आहे. पण निवडणूका समोर असल्याने काही विरोधक याचं भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात त्यांना भाजपवर टीका करण्यासाठी कोणतंही कारण मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं निमित्त करून ते टीका करत आहेत. आज आलेल्या पुढाऱ्यांपैकी एखादा राष्ट्रपुरुषाचा पुतळा, एखादी शाळा, बालवाडी किंवा धार्मिक स्थळ उभारण्यात एकाचंही योगदान नाही. आमच्या सरकारवर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरं कामच नाही," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  मालवणमधील पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ १ सप्टेंबरला मविआचं आंदोलन!
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात. त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षाच नाही. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. पण एकतरी पुतळा उभारला का? त्यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळाही सरकारच्या खर्चाने उभारला. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121