मनोज जरांगेंचं अटक वॉरंट रद्द! कोर्टाने दिली समज

    02-Aug-2024
Total Views | 56
 
Jarange
 
पुणे : पुणे न्यायालयाने मनोज जरांगेंचे अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे. एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर आज ते पुणे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, आता त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
 
तसेच पुणे न्यायालयाने मनोज जरागेंना समज दिल्याचेही सांगण्यात येत आहे. समाजमाध्यमांमध्ये बोलताना न्यायालयाचा अवमान होईल, असे वक्तव्य करु नये. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी समज कोर्टाने त्यांना दिली आहे. तसेच त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे.
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहिण योजनेच्या यादीत उद्धवसेनेचेच लाभार्थी सर्वात जास्त!
 
नेमकं प्रकरण काय?
 
मनोज जरांगेंनी २०१३ मध्ये जालना येथे एका नाटकाचे सहा प्रयोग आयोजित केले होते. पण त्यांनी निर्मात्याला याचे पूर्ण पैसे दिले नव्हते. त्यामुळे नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंसह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात कोथरूड पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनंजय घोरपडे यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात मनोज जरांगेंना दोनदा समन्स बजावण्यात आले. परंतू, ते सुनावणीकरिता उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला होता.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121