मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nishikant Dubey on Bangladeshi) “घुसखोरांना संथाल परगणा येथून हुसकावून लावले नाही आणि ताबडतोब थांबवले नाही तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.", असा इशारा भाजपचे लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुर्शिदाबाद, मालदा, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, किशनगंज आणि अररियासह संथाल या सहा जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांनी ज्या प्रकारे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे ते चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे वाचलंत का? : बांगलादेश निवडणुकीत हिंदूंच्या भूमिकेबाबत संयुक्त राष्ट्राचे विशेष आवाहन!
आदिवासींच्या जमिनींवर अतिक्रमण होत आहे, पाकुरमध्ये स्थानिक आदिवासी पोरांना मारहाण केली जात आहे, हिंदू तारानगर सारखी ठिकाणे सोडून जात आहेत, शेजारच्या वस्तीतील लोकांनी गोपीचक (गोपीनाथपूर) येथे हल्ले सुरू केले आहेत, त्यामुळे येथील आदिवासी धोक्यात आहेत, असे निशिकांत दुबे पुढे म्हणाले. त्यांनी पुढे खुलासा केला की ते अनुसूचित जमातीसाठी राखीव गावे, त्या गावांचे प्रमुख, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य जे एसटी समाजातील आहेत तेथे जनजागृती मोहीम राबवणार आहे.