आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण! दरेकरांनी सुनावले खडेबोल

    05-Jul-2024
Total Views | 53
 
Pravin Darekar
 
मुंबई : आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण सुरु आहे, असे म्हणत भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली खेळी करत तब्बल १३ वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार करण्यात येणार आहे. पण या सत्काराचे निमंत्रण नसल्याचे सांगत भाई जगताप आणि अनिल परब यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर प्रविण दरेकर यांनी विरोधक आनंदाच्या गोष्टीतही राजकारण करत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची भुमिका आहे, अशी टीका केली.
 
हे वाचलंत का? -  मिरवणूकीच्या बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते!
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्त आहे. त्याच्याशी आम्हीही सहमत आहोत. अधिकृत निमंत्रण सभापती किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणे अपेक्षित आहे यात दुमत असायचे कारण नाही. आपला देश जगज्जेता झाला. लाखोंचा जनसागर उसळला होता. परंतू, तुम्हाला ती गुजरातची बसच दिसली, एवढ्या कोत्या मनोवृतीचे आहात हे बरोबर नाही. निमंत्रणावर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा फोटो लावणार नाही, तर मग काय शंभर फोटो लावायचे का? असा सवाल करत विरोधक अशा वेळेला पण आनंद साजरा न करता राजकारण करतात. खोटे बोल पण रेटून बोल असे धोरण विरोधकांचे आहे," असे म्हणत त्यांनी सभागृहात विरोधकांना खडेबोल सुनावले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121