नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली! दोघांचा मृत्यू

    27-Jul-2024
Total Views | 52
 
Navi Mumbai
 
नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शनिवारी पहाटे नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळली आहे. यात २ दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
 
गेले ४ ते ५ दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता नवी मुंबईतील शाहबाज गावाताली तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीत एकूण २४ कुटुंबे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील ५२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या उपस्थितीत बचावकार्य सुरू आहे.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटाला ठाण्यात मोठं खिंडार! युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत प्रवेश
 
मागील आठवड्यातही अशीच एक घटना घडली होती. मुंबईतील ग्रँट रोड परिसरात एका इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121