विधानसभेत मराठा आरक्षण प्रश्नी गदारोळ! विरोधकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा गाजला

    10-Jul-2024
Total Views | 56
 
Rahul Narvekar
 
मुंबई : मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. परंतू, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, आज विधानसभेत त्याचे पडसाद उमटले असून सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ५ मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
 
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी दांडी मारली. त्यामुळे भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मराठा आणि ओबीसींचं विरोधकांना काहीही पडलेलं नसून त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, असे त्यांनी म्हटले.
 
हे वाचलंत का? -  "मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला विरोधकांना वेळ नाही, पण वडेट्टीवारांच्या घरी..."; फडणवीसांचा घणाघात
 
त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार वेलमध्ये उतरले. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृह ५ मिनिटांसाठी तहकूब केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121