मुंबई:आरबीआयकडून मोठी माहिती पुढे आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाढलेल्या सेवांमुळे वित्तीय तूटीत मोठी घट झाली असुन वित्तीय अधिशेषात (Surplus) मध्ये वाढ झाली. आरबीआय (Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार, अखेरच्या तिमाहीत भारताच्या अधिशेषात वाढ झाली असुन वित्तीय तूटीत घसरण झाली आहे.
संबंधित आकडेवारीनुसार, करंट अकाऊंट डेफिसिट (Current Account Deficit CAD) मध्ये २ टक्क्यांवरून घसरण होत जीडीपी (GDP) मधील तुलनेत ०.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच ही तूट ६७ अब्ज डॉलर्सवरून घसरत २३.२ अब्जावर पोहोचली आहे. आरबीआयच्या माहितीप्रमाणे, ' भारताच्या चालू खात्याने मागील आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत उच्च सेवांमुळे अधिकची वाढ नोंदवली आहे, तर व्यापारी व्यापार तूट कमी झाल्यामुळे चालू खात्यातील तूट आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कमी झाली आहे.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४४.१ अब्ज डॉलर्सची आवक भारतीय बाजारात केली आहे तर निव्वळ जावक (Net Outflow) ५.२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. निव्वळ परदेशी गुंतवणूकीत ९.८ अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ही गुंतवणूक २८ अब्ज डॉलर होती.
'सेवा क्षेत्रातील निर्यातीत ४.१ टक्क्यांनी वाढ इयर ऑन इयर बेसिसवर झाली आहे. वाढलेल्या सॉफ्टवेअर, सेवा, व पर्यटन यामध्ये झालेल्या वाढीमुळे निर्यात वाढल्याचे आरबीआयच्या वतीने निवेदनात म्हटले गेले आहे. निव्वळ सेवेत मागील वर्षाच्या ३९.१ अब्ज डॉलर्सवरून वाढत ४२.७ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे. ज्यामध्ये अधिशेष गाठणे शक्य झाल्याचे यात स्पष्ट झाले आहे. याप्रमाणेच आरबीआयच्या निवेदनात म्हटले आहे की, ' व्यापारी तूटीत मागील वर्षाच्या ५२.६ अब्ज डॉलर्सचा तुलनेत घसरण होत ५०.९ अब्ज डॉलर्सवर तूट पोहोचली आहे.
मार्च तिमाहीत देशाची देयके शिल्लक $30.8 अब्ज अतिरिक्त होती, जी एका वर्षापूर्वी $5.6 अब्जच्या अधिशेषाच्या तुलनेत होती.