मुंबई: भारतातील किरकोळ महागाई (Retail Inflation) मध्ये आता स्थिरता येऊन नियंत्रणात आले आहे मात्र त्यातील चढउतार राहण्याची शक्यता अजूनही असल्याचे आरबीआयने आपल्या ' स्टेट ऑफ द इकॉनॉमी ' या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. तसेच अन्नधान्याच्या महागाईत होणारी वाढ देखील चिंतेचा विषय असल्याचे यात म्हटले गेले आहे. मागच्या तिमाहीतील तुलनेत जीडीपीत वेगाने वाढ कायम असल्याचे सुतोवाच देखील यामध्ये करण्यात आले होते.
आरबीआय डेप्युटी गव्हर्नर मायकल पत्रा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीमने निरिक्षणात म्हटले आहे की, 'दक्षिण पश्चिमेकडील मान्सून वारे सुरू झाल्याने यावेळी शेती क्षेत्र सुस्थितीत येऊ शकते' असे म्हटले गेले आहे. मात्र यात अन्नधान्याच्या महागाईची चिंता कायम राखली असून वाढती महागाई हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले गेले आहे. हेडलाईन इन्फेक्शन (महागाई) मात्र कालानुरूप कमी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. आरबीआयच्या या परिक्षणात महागाई ही २ ते ४ टक्याच्या टप्प्यात अथवा मर्यादेत राहु शकते असे म्हटले गेले होते.
यापूर्वी आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो दर स्थिर ठेवल्याचा निर्णय आपल्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेतला होता. तसेच Withdrawal of Accomodation ' वर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे निवेदनात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना म्हटले होते. त्यांनी बैठकीनंतर रेपो दर ६.५० वर कायम ठेवला होता. महागाई बाबत बोलताना आरबीआयने किरकोळ महागाई ५.४ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांवर या आर्थिक वर्षात येऊ शकतो असे म्हटले होते.
आरबीआयच्या या अहवालात दिलेली ही मते संबंधित लेखकांची वैयक्तिक मते असून आरबीआय त्यावर सहमत असेलच असे नाही असे सांगण्यात आले आहे. अनेक आर्थिक संस्थांनी भारताचा जीडीपी दर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असे सुचवले होते.