जरांगेंनी आत्मक्लेश थांबवावा : छगन भुजबळ

    13-Jun-2024
Total Views | 48
 
Chhagan Bhujbal
 
मुंबई : मनोज जरांगेंनी उपोषण करुन आत्मक्लेश थांबवायला हवा, असं वक्तव्य ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मागील सहा दिवसांपासून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "मनोज जरांगेंनी उपोषण करुन आत्मक्लेश थांबवायला हवा. ओबीसींना धक्का न लागता त्यांच्या मागण्या पूर्ण होतील यावर सरकार विचार करत आहे. आताच सर्वजण निवडणूकीतून मोकळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारला वेळ द्यायला हवा. सरकारला किंवा कुठल्याही पक्षाला दलित, आदिवासी, अस्पसंख्यांक, मराठा, ओबीसी आणि भटके विमुक्त अशा सर्व घटकांना बरोबर घेऊन जावं लागतं. त्यामुळे विचार करुन निर्णय घ्यावे लागतात," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित
 
जरांगेंनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, "छगन भुजबळ अनेक वर्ष टीकेचे घाव सोसत आलाय. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. मी फक्त एवढंच म्हणतो की, कोणत्याही समाजाच्या अधिकाराला धक्का न लावता जो निर्णय घेता येईल तो घ्यावा. कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझा हा मुद्दा मी कधीही सोडणार नाही. यासाठी मी मागच्या वेळी मंत्रीपदही सोडायला तयार झालो होतो," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121