मसाल्यातील ईथीलीन ऑस्काईडवर सरकारची करडी नजर

भारत सरकार अँक्शन मोडवर

    06-May-2024
Total Views | 35

Masala
 
 
मुंबई: जागतिक पातळीवरील भारतीय मसाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने भारत सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. भारत सरकारने ईथीलीन ऑक्साईडचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यातीत तयार केलेल्या मसाल्यावर आता निर्बंध घातले आहेत. मसाल्यावर आता सरकारची करडी नजर असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात केलेल्या भारतीय मसाल्यात घातक केमिकल्सचा वापर केला जात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालात केला गेला होता.विशेषतः एमडीएच व एव्हरेस्ट मसाला या उत्पादनावर आरोप झाल्याने भारत सरकार अँक्शन मोडवर आले आहे.
 
ईथीलीन ऑक्साईडचा वापर स्टरलायजिंग एजंट व इन्सेक्टिसाईड म्हणून केला जातो. या पदार्थांचा वापर प्रमाणाहून अधिक केल्यास आरोग्यास घातक ठरू शकतो. देशांतर्गत मसाल्यातील ईथीलीन ऑक्साईडचा वापरावर बंदी आहे तथापि आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीत केलेल्या मसाल्यात एका मर्यादेपर्यंत घालण्याची परवानगी आहे. भारतातील वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात वैयक्तिक लक्ष घालून याबद्दलची चाचपणी करणार आहे.
 
६ मे पासून भारतातून पाठवलेल्या जाणारया मसाल्याचे नमुने भारतीय स्पाइस बोर्ड तपासणार आहे. हाँगकाँग सिंगापूर येथील अथोरिटीने भारतीय मसाला उत्पादनावर बंदी घातल्यानंतर याबाबतचा अहवाल युरोपियन फूड सेफ्टी अथोरिटीने प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये अनेक उत्पादनात इथीलीन ऑक्साइडचे प्रमाण आढळले आहे. या पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरची शक्यता असते.
याबाबत भारतीय नियामक मंडळ फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने गंभीर दखल घेत या उत्पादनाचे चेकिंग करण्याचे आदेश दिले आहेत आता भारतातील मसाले अथवा अन्नपदार्थांचे बारकाईने तपासणी होणार असून सरकारने केलेल्या मानके (Standards) पाळली जात आहेत की नाही याची दखल घेतली जाणार आहेत.
 
फूड स्टरलायजिंग व साठवणूकीला पर्याय म्हणून गॅमा ट्रिटमेंटचा वापर होऊ शकतो का याची चाचपणी एफएसएसएआय करत आहे. याशिवाय अन्नपदार्थ सुरक्षेसाठी काही विशेष मार्गदर्शन तत्वे असणारी कागदपत्रे आणणार असल्याची शक्यता आहे.
 
अन्नपदार्थांमधील कीटकनाशकांच्या अवशेषांसाठी भारतात सर्वात कठोर नियम आहेत आणि अन्न नियामक FSSAI मसाले आणि औषधी वनस्पतींमध्ये उच्च पातळीच्या अवशेषांना परवानगी देतो असे सूचित करणारे अहवाल नाकारले आहेत, असे सरकारने रविवारी ठामपणे सांगितले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121