देशभरातील संतांनी साजरा केला ५०० वर्षांची परंपरा असलेला 'धुलोट महोत्सव'

    24-May-2024
Total Views | 21

Dhulot Mahotsav

मुंबई (प्रतिनिधी) :
(Dhulot Mahotsav) उत्तर प्रदेशच्या ब्रज येथे गिरीराज महाराजांच्या पायथ्याशी बांधलेल्या राधाकुंडात अनेक संतांनी भजन गात नुकताच धुलोट महोत्सव साजरा केला. या महोत्सवात देशाभरातील विविध प्रांतातील संतगण सहभागी झाले होते. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या लीला याठिकाणी सादर केल्या होत्या, अशी मान्यता आहे. श्रीकृष्ण आणि राधेच्या चरण स्पर्शांमुळे येथील माती पवित्र झाल्याचे सांगितले जाते. गोवर्धनमध्ये ५०० वर्षांहून अधिक काळापासून धुलोट उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे.

धुलोट महोत्सवाची सुरुवात सकाळी श्रीपाद रघुनाथदास गोस्वामी गद्दीचे प्रमुख महंत केशवदास महाराज यांच्या दिग्दर्शनात गायन व वादनाने झाली. सर्वप्रथम संतांनी राधाकुंडाची प्रदक्षिणा केली. परिक्रमा मार्गावरील १८ मंदिरांमध्ये राधा-कृष्णाच्या करमणुकीचे गायन आणि स्तुती करण्यात आली. त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतील तसेच परदेशातील भाविकांनी धुलोट उत्सवात सहभाग घेतला होता.

अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121