कोची : केरळमध्ये डाव्या सरकारने राजकीय हिंसाचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे महिमामंडन करण्याचे काम हाती घेतले आहे. डाव्या पक्षाकडून केरळमधील कन्नूर येथे जून २०१५ मध्ये बॉम्ब बनवताना प्राण गमावलेल्या सीपीआय(एम) कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. पक्षाचे राज्य सचिव एमव्ही गोविंदन यांच्या हस्ते दि. २२ मे रोजी स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.
माकप नेते पी जयराजन यांनी या मरण पावलेल्या कार्यकर्त्यांचे स्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्मारकाच्या बांधकामाबाबतचा वाद सातत्याने वाढत आहे. डाव्या पक्षाच्या या निर्णयावर विरोधी पक्ष टीका करत आहेत. तर माकप नेते पी जयराजन यांनी बॉम्ब बनवताना मरण पावलेल्या कार्यकर्त्यांना शहीद संबोधले आहे. या कार्यकर्त्यांची प्रतिमा धुमिळ करण्याचं काम माध्यामांनी केला असा आरोपही त्यांनी केला.
उल्लेखनीय म्हणजे, जून २०१५ मध्ये बॉम्ब बनवताना प्राण गमावलेल्या सीपीआय(एम) कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. स्मारकाच्या उद्घाटनाची घोषणा करणारे पोस्टर्स समोर आल्यानंतर, विरोधी पक्षांनी माकपवर टीका केली होती. राजकीय हिंसाचार करणे ही डाव्या पक्षांची संस्कृती असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.