दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या आकडेवारी

    20-May-2024
Total Views |

Voting
 
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha elections) पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असून सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत एकुण १३ मतदारसंघांमध्ये सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे. यावेळी कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:
 
धुळे - २८.७३ टक्के
 
दिंडोरी - ३३.२५ टक्के
 
नाशिक - २८.५१ टक्के
 
पालघर - ३१.०६ टक्के
 
भिवंडी - २७.३४ टक्के
 
कल्याण - २२.५२ टक्के
 
ठाणे - २६.०५ टक्के
 
मुंबई उत्तर - २६.७८ टक्के
 
मुंबई उत्तर-पश्चिम - २८.४१ टक्के
 
मुंबई उत्तर-पूर्व - २८.८२ टक्के
 
मुंबई उत्तर-मध्य - २८.०५ टक्के
 
मुंबई दक्षिण-मध्य- २७.२१ टक्के
 
मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के