ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेची जबाबदारी स्विकारावी! ब्लेमगेम करण्यात अर्थ नाही

    16-May-2024
Total Views | 140
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली पाहिजे. यात ब्लेमगेम करण्यात अर्थ नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमधील रोड शोवरही टीका केली.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी घाटकोपरमधील दुर्घटनेची जबाबदारी स्विकारायला हवी. महानगरपालिकेत त्यांची सत्ता असताना ते होर्डिंग उभं राहिलेलं आहे. त्यामुळे यामध्ये ब्लेम गेम करण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी महानगपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार होतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही," असे ते म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमधील रोड शोबाबत बोलताना ते म्हणाले की, "कुठल्याही व्यक्तीला प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण ज्या घाटकोपरला पंतप्रधान मोदी रोड शो करत आहेत तिथे एक घटना घडली आहे. तो पेट्रोल पंप ज्याचा कुणाचा होता आणि ते होर्डिंग लावण्यास ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई होणार की, नाही याबद्दल मोदींनी सांगावं. त्यांनी नुसतं आम्ही कारवाई करु असं शाब्दिक म्हणू नये. त्या बोर्डाचा मालक आणि पेट्रोल पंपाचा मालक यांच्यावर कारवाई होणार की, नाही हे त्यांनी सांगावं," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121