"एकनाथ शिंदे ७-८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते, पण ठाकरेंनी..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट

    15-May-2024
Total Views | 788
 
Fadanvis & Shinde
 
मुंबई : २०१९ मध्ये एकनाथ शिंदे ७-८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते. पण उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नेतृत्व केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यावेळी शिंदे ७ ते ८ तासांसाठी मुख्यमंत्रीदेखील झाले होते. त्यांच्या घरात सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली होती. परंतू, नंतर ठाकरेंनी स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला," असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
 
हे वाचलंत का? -  "नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसविलीन होईल तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येईल!"
 
"उबाठा गट आता मराठी मतांवर जगण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यांना आता मुस्लिम मतांवर गुजराण करायची आहे. आजवर काँग्रसने जेवढं तुष्टीकरणाचं आणि मतांच्या लांगूलचालनाचं राजकारण केलं नाही त्यापेक्षाही जास्त मतपेढीचे राजकारण उबाठा गट करत आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121