कॅनडाच्या निराधार आरोपांना भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर!

    06-Apr-2024
Total Views | 45
india-has-reacted-strongly-to-canadas-allegations

 
नवी दिल्ली :     भारत - कॅनडा या उभय राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आला आहे. भारताने आपल्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप कॅनडाने केला आहे. या आरोपांना भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कॅनडाच्या नव्या आरोपांमुळे भारताकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, कॅनडाने केलेले आरोप निराधार असल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, “इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हे भारत सरकारचे धोरण नसून कॅनडाच आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे.” कॅनडाच्या प्रसारमाध्यमांमध्ये कॅनडाच्या गुप्तचर संस्था सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (सीएसआयएस)च्या हवाल्यानुसार एका अहवालात म्हटले आहे की, २०१९ व २०२१ मध्ये झालेल्या फेडरल निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता.


गेल्या वर्षी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाने हा आरोप केला आहे. या आरोपांना भारताकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेत ढवळाढवळ करणे हे आमचे धोरण नाही, अशा शब्दांत कॅनडाला खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

२०२१ मध्ये भारत सरकारच्या परकीय हस्तक्षेपाच्या कारवाया अल्पसंख्य जनता असलेल्या जिल्ह्यांमधील निवडणुकांमध्ये केंद्रित झाल्याचा आरोप गुप्तचर संस्थेने केला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, भारतीय-कॅनडियन मतदारांचा एक भाग खलिस्तानी चळवळीशी सहानुभूती बाळगणारा किंवा पाकिस्तान समर्थक राजकीय भूमिका असल्याच्या समजामुळे भारत सरकारकडून त्या निवडणूक जिल्ह्यांना लक्ष्य करण्यात आले, असा निराधार आरोप कॅनडाकडून करण्यात आला आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121