नवी मुंबईत उभारतेय बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल

सिडको संचालक मंडळाने दिले तात्पुरते ना हरकत

    25-Apr-2024
Total Views |

nmmc


नवी मुंबई, दि.२५ : 
सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळ भूखंडावर आता सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप - पीपीपी) बहुमजली (मल्टीस्टोरीड) वाहनतळासोबत वाणिज्य संकुल (कमर्शिअल कॉम्फ्लेक्स) उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याकरिता या दोन्ही भूखंडाचा वापर बदल करण्याकरिता महापालिकेने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सिडकोकडे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र मागितले होती.
अखेर सिडकोने संबंधित भूखंडाच्या वाणिज्य वापरातून महापालिकेला मिळणाऱ्या नफ्याच्या उत्पन्नातील २५ टक्के हिस्सा सिडकोला देण्याच्या अटीवर महापालिकेला भूखंडाच्या वापर बदलास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र (प्रोव्हीजनल एनओसी) देण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे या दोन्ही भूखंडावर पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळासह वाणिज्य संकुल उभारण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी मुंबई महापालिकेला सार्वजनिक वाहनतळ उभारणीसाठी सिडकोने बेलापूर सेक्टर-१५ येथे तब्बल ६७६० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड क्र.७२ हा राखीव किंमतीच्या २५ टक्के दराने म्हणजेच १ कोटी १८ लाखाला ऑगस्ट २०१५ व वाशी सेक्टर-३०ए येथे तब्बल ११९०४ चौ.मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्र. ३६ ए हा राखीव किंमतीच्या २५ टक्के दराने म्हणजेच ५ कोटी ९८ लाख ४६ हजाराला सफ्टेंबर २०१८ मध्ये वितरित केला होता. ३१ जानेवारी २०२४ रोजी तत्कालीन नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी बेलापूर व वाशी इथल्या वाहनतळाच्या भूखंडावर बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यासाठी सिडकोकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती.
भूखंडाच्या वापर बदलास सिडकोच्या विकास नियमावली व २०२० च्या युडीसीपीआरमधील तरतुदीनुसार धोरण नसल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. परंतु, एनएमएमटी उपक्रमास दिलेल्या बसडेपो व बस टर्मिनलच्या भूखंडाचा वाणिज्य वापर करण्यास सिडकोने नवी मुंबई परिवहन उपक्रमास परवानगी दिली होती. याचाच आधार घेत अखेर सिडकोने सार्वजनिक वाहनतळाच्या भूखंडाचा वापर बदल करण्यास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र देऊन नवी मुंबई महापालिकेस बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यास मंजुरी दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूरनंतर आता

ऑपरेशन सिंदूरनंतर आता 'ऑपरेशन पुशबॅक'ने उडवली बांगलादेशची झोप!

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121