तुम्हीही ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बाळगत आहात! पहा महिलेसोबत काय घडलं?

    02-Apr-2024
Total Views | 184
Tamil Nadu Election Officers Action


मुंबई :   
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला असताना निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आले आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तर नेमंक निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय तरी काय त्याबाबत जाणून घेऊयात.


 

निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षांना निवडणुक प्रक्रियेशीसबंधित हालचालींवर बंधन घालण्यात आली आहेत. आता तामिळनाडूत असा एक प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब येथील एक कुटुंब थेट तामिळनाडूकरिता प्रवास निघाले असताना कुटंबाकडे असलेल्या एकूण ६८,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर रोकड निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीपूर्वीची आयोगाची कठोर कारवाई असल्याचे समोर आले आहे.
 
 
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सदर कुटुंबीयांची चौकशी करत त्यांच्याकडील ६८ हजारांची रोख जप्त केली. यावेळी कुटुंबातील एक महिला रडताना सुध्दा पाहायला मिळाली परंतु, अधिकाऱ्यांकडून कोणतीही सहानुभूती न दाखविता आपले कर्तव्य बजावत आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर सदर कुटंबीयांची रोख रक्कम परत करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान होईपर्यंत कृपया कागदपत्रांशिवाय ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख बाळगू नका. कारण पुढील दोन महिन्यांपर्यंत लागू झालेली निवडणूक आचारसंहिता यास कारणीभूत आहे. नाहीतर तुमचीदेखील निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाऊ शकते. तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कौतुकास्पद कार्यवाहीमुळे भारतासारख्या प्रगत देशांमध्ये केवळ कायदे कठोर नाहीत, तर त्यांची अंमलबजावणीही सक्षम होत आहे, जे अधिक महत्त्वाचे आहे.
 

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121