'पप्पू' हे त्यांचं घरचं नाव! राहूल गांधींना फडणवीसांचा टोला

    16-Apr-2024
Total Views | 62
 
Rahul Gandhi & Fadanvis
 
सोलापूर : पप्पू हे त्यांचं घरचं नाव आहे तुम्ही राहूल गांधी म्हणा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. महायूतीचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपूते यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे मंगळवारी जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
"कमळाचं बटण दाबंलं तर मोदींना मत जातं आणि तुतारीचं दाबलं तर कोणाला मत जातं? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना विचारला होता. यावर जनतेतून पप्पू असा आवाज आला. यावर ते म्हणाले की, "पप्पू हे त्यांचं घरचं नाव आहे. तुम्ही राहूल गांधी म्हणा."
 
हे वाचलंत का? -  शिवसेना कुणाची? ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काही लोकांना वाटतं की, ही निवडणूक निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे, काहींना वाटतं की, राम सातपूते विरुद्ध शिंदे आहे. पण ही निवडणूक यांची नाही तर ती केवळ नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहूल गांधी अशी आहे. ही ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि विधानसभेची निवडणूक नाही, तर ही निवडणूक भारताचा नेता आणि देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे."
 
"याठिकाणी केवळ दोनच पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे विकासपुरुष नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातील महायूती तर दुसरा पर्याय हा राहूल गांधी आणि त्यांच्या अंतर्गत २६ पक्ष आहेत. मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं पॉवरफूल इंजिन आहेत आणि यामध्ये एनडीएचे डबे लागलेले आहेत. आपल्या गाडीमध्ये प्रत्येकाला बसण्याची जागा आहे. दुसरीकडे, राहूल गांधींच्या गाडीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे सगळे स्वत:ला इंजिन म्हणतात. तिथे डबे नाहीत," असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121