"वेळ आल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य

    11-Apr-2024
Total Views | 214

Fadanvis 
 
गडचिरोली : गडचिरोलीचा कायापालट करणं हे एकमेव ध्येय असून वेळ आल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण गडचिरोलीचं सोडणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी गडचिरोली येथे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी स्वत: गडचिरोली जिल्हा मागून घेत माझ्याकडे पालकमंत्रपद घेतलं आहे. माझी कुठलीही संस्था नसून मी २४ तास सामाजिक काम करतो. गडचिरोलीचा कायापालट करणं आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणं हे एकमेव ध्येय घेऊन मी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर वेळ पडल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण गडचिरोलीचं सोडणार नाही. जोपर्यंत गडचिरोलीचा विकास होत नाही तोपर्यंत याकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय मी घेतला आहे."
 
हे वाचलंत का? -  "वडेट्टीवार चव्हाणांचे राईटहँड! लवकरच भाजपमध्ये जाणार!"
 
"विदर्भाचा विकास करणारा समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबई ते गडचिरोली हे अंतर आता ८,९ तासांत पूर्ण करण्यात येणार आहे. पुढच्या १५ वर्षांमध्ये आम्ही गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवून दाखवणार आहोत," असे आश्वासन त्यांनी दिले.
 
ते पुढे म्हणाले की, "मोदीजींनी आज २० कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्क्या घरात आणलं. गरीबाचा विकास करुनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते, हे मोदीजींनी दाखवून दिलं. २०१३ साली आपला देश अर्थव्यवस्थेत अकराव्या क्रमांकावर होता. मोदीजींनी गरीबाची सेवा करुन तो पाचव्या क्रमांकावर आणला. पुढील पाच वर्षात आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करणार आहेत. या सर्व कामांमुळेच मोदीजींकडे जगातला सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पाहिलं जातं," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121