मोदींनी ३७० हटवून काय दिवे लावले : संजय राऊत

    06-Mar-2024
Total Views |

Sanjay Raut


मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय दिवे लावले, अशी टीका उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी की, ते आज ज्यांच्यासोबत बसले आहेत त्यांनी कलम ३७० हटवण्याला विरोध केला होता, असं वक्तव्यं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलं होतं. त्यानंतर राऊतांनी ही टीका केली.
 
संजय राऊतांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय दिवे लावले. आपल्या राज्यात ३७० कलम हटवल्यानंतर आजही हजारों काश्मीरी पंडीत निर्वासिताचं जीवन जगत आहेत. त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आजही काश्मीरी तरुण अस्वस्थ आणि अस्थिर आहेत," असे ते म्हणाले आहेत.

 
दरम्यान, यावर भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "कलम ३७० हटवल्यानंतर काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. कधीतरी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला काश्मीरला जा आणि तिथे जो तिरंगा फडकवला जातो त्याकडे बघा," असे ते म्हणाले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121