मोठी बातमी! आता मढ-वर्सोवा दीड तासांचे अंतर १० मिनिटांत पूर्ण होणार!

मढ-वर्सोवा दरम्यान केबल आधारित पूल, वाहतूक कोंडी फुटणार

    05-Mar-2024
Total Views | 89
 Madh Versova Cable Bridge
 
मुंबई :  वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उन्नत रस्तेबांधणीला मुंबईत वेग आहे. याच पार्श्वभूमीवर आता मढ - वर्सोवा दरम्यान केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हा पूल सेवेत आल्यानंतर मढ वर्सोवा दीड तासांचे अंतर १० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच, या पुलामुळे अंधेरी, मढ, बोरिवली आणि गोराई भागातील वाहतूक कोंडीवरही तोडगा निघेल.

दरम्यान, खार सब वे आणि वांद्रे टर्मिनस कनेक्टर पूर्व-पश्चिम जोडणीसाठी उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. मढ - वर्सोवा दरम्यान केबल आधारित पूल बांधणे तसेच खार सब वे जवळ उन्नत रस्ता उभारण्यात येणार असून दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

गोरेगाव मुलुंड लिंक रोड, वर्सोवा - दहिसर, दहिसर भाईंदर दरम्यान उन्नत मार्ग बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तर मढ - वर्सोवा दरम्यान अनेक गाव असून त्यांना ये जा करण्यासाठी बोट फेरीचा आसरा घ्यावा लागतो. याठिकाणी पूल व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांची मागणी होती. अखेर यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येईल, असे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पालिकेने खाडीवर पूल उभारणीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने फेब्रुवारी २०२३ मध्ये यास मंजुरी दिली. तर नुकतीच सीआरझेडची परवानगी मिळाली.

पूलाचा आराखडा आणि बांधकामासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. या पुलाची उभारणी तीन वर्षांत करावी लागणार आहे. पूल उभारणी झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे. बोटीच्या मार्गातील अडथळे आणि या बांधकामावेळी गाळ साचण्याची शक्यता यामुळे मच्छिमारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र प्रकल्पाचे महत्त्व सांगितल्यानंतर हा विरोध मावळला आहे.

पूर्व-पश्चिम जोडणीसाठी उन्नत मार्गासाठी ५०० कोटी!

मुंबई महानगरपालिकेने खार सब वे पूर्व-पश्चिम आणि वांद्रे टर्मिनस कनेक्टर पूर्व-पश्चिम जोडणी देण्यासाठी उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचे तीन टप्यांत काम होणार असून यासाठी निविदा काढली आहे. साधारण पाच किलोमीटर लांबीचा हा पूल असेल. सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121