काव्यातून राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल खास प्रतिक्रिया

    28-Mar-2024
Total Views | 134
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
 

rahul  
 
मुंबई : दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांसोबतच मराठी कलाकारांना देखील या चित्रपटाने भारावून टाकले आहे. अनेक कलाकार या चित्रपटाचे आणि रणदीपचे (Swatantryveer Savarkar) कौतुक करत आहेत. आता संगीतकार, गायक राहुल देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे कौतुक केले आहे.
 
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यानंतर राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "शतजन्म शोधिताना शत आर्ती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या ! Take a bow रणदीप हुड्डा." राहुल देशपांडेनी यात सावरकरांनी लिहिलेल्या काव्याच्या ओळी वापरुन रणदीपच्या अभिनयाचे आणि चित्रपटाचे कौतुक केले आहे.
 

rahul post  
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटी आणि पाचव्या दिवशी १.०७ कोटी असे एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत १२.४१ कोटी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूरनंतर आता

ऑपरेशन सिंदूरनंतर आता 'ऑपरेशन पुशबॅक'ने उडवली बांगलादेशची झोप!

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे ..

गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121