“ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा”, स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया

    26-Mar-2024
Total Views | 82
प्रवीण तरडे यांनी त्यांच्या खास शैलीत स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
 

pravin tarade 
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटात सावरकरांचे प्रेरणादायी जीवन, त्यांचा संघर्ष भव्य पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले असून सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा देखील त्यानेच साकारली आहे. देशभरातून या चरित्रपटाला उत्तम प्रतिसाद येत असून मराठी कलाकारांनी देखील या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करत चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची या (Swatantryaveer Savarkar) चित्रपटासाठीची पोस्ट सध्या तुफान वायरल होत आहे. यात त्यांनी ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा असे लिहित चित्रपटाचे कौतुक केले आहे.
 
हे वाचलंत का? - “तुम्ही बाहेर निघा…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान अंकिता पापाराझींवर भडकली  
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी ">प्रवीण तरडे यांनी पोस्ट करत लिहिले आहे की,
॥ धर्मो रक्षिती रक्षित:॥
अफाट अचाट आयुष्य जगलेल्या
जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या
महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं
ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा, अशी पोस्ट प्रवीण तरडेंनी करत सोबत चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर केले आहे.
 

pravin post 
 
तसेच, या पुर्वी अभिनेते अजय पुरकर यांनी देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून देशभरातील लोकांनी आपल्या मुलांसह हा चित्रपट पाहावा असा आग्रह करणारा व्हिडिओ शेअर केला होता. दरम्यान, २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे. राजा सुहेलदेवने २०-२५ हजार सैनिकांसह दीड लाख सैनिक असलेल्या सालार गाझी मसूदचा पराभव केला. त्याला जिवंत पकडले आणि इस्लाममधील नरकाच्या बरोबरीची शिक्षा त्याला देण्यात आली. उत्तर प्रदेशात अशा गाझीच्या नावाने भरणारा मेळाव्याचे नाव बदलून महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने मेळा भरवण्यास सुरुवात केली", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराज सुहेलदेव यांच्या विजय दिनानिमित्त मंगळवारी बहराइच येथे आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121