'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असून प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळवला आहे.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील आवर्जून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून आग्रह केले आहेत.
रणदीप हुड्डा याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन प्रदर्शनापासून ते आत्तापर्यंत अशा एकूण चार दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई किती झाली याबद्दल पोस्ट केली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी आणि चौथ्या दिवशी २.१५ कोटी असे एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत १०.९६ कोटी कमावले आहेत.
“तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांचा थेट प्रश्न
सुप्रिया पिळगांवकर यांनी या चित्रपटाचे कौतुक करत बालपणीची एक आठवण पोस्टमध्ये शेअर केली आहे. त्यांनी 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट पहिला आणि त्यानंतर पोस्ट करत म्हणाल्या की, “मी १२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला माझ्या शाळेच्या सुट्टीत वाचण्यासाठी एक पुस्तकआणून दिलं. ते एक जाडजूड पुस्तक होतं. सुट्टीच्या शेवटी ते वाचून पूर्ण करणं अपेक्षित होतं. मी वाचायला सुरुवात केली आणि मी वाचन पूर्ण होईपर्यंत ते खाली ठेवूच शकले नाही. वाचनात सुरुवातीला खूप वेळा थांबावं लागलं कारण मी रडत होते, नुसती रडत होते, पुस्तकात अर्ध्या वाचनानेच मी सुन्न झाले होते. ते पुस्तक पुन्हा काल जिवंत झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं माझी जन्मठेप ! आणि चित्रपट वीर सावरकर हा. हा चित्रपट बघण्याची हिम्मत तुम्ही दाखवू शकाल का?', अशी डोळ्यांच्या कडा पाणावणारी पोस्ट सुप्रिया यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुस्तक आणि चित्रपट दोन्ही अप्रतिम असल्याचे म्हटले आहे.