"ठाकरेंनी भाजपशी युती करु नये यासाठी राऊतांना काँग्रेसकडून सुपारी!"

    21-Mar-2024
Total Views | 155
 
Raut & Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंनी कधीही भाजपशी युती करु नये म्हणून संजय राऊतांना काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच स्वार्थाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. राणेंनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी कधीच भाजपशी युती करु नये यासाठी संजय राऊतांना काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे. त्यातूनच ते दिवसरात्र भुंकण्याचं काम करत आहेत आणि त्यांना लवकरच याचे परिणाम कळतील. भाजप आणि पंतप्रधान मोदींनी कधीही स्वार्थाचं राजकारण केलेलं नाही. परंतू, स्वार्थाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. ज्यांनी महाराष्ट्र स्वत:च्या मेहुण्याला विकण्यासाठी काढला त्यांनी दुसऱ्यांना स्वार्थी म्हणण्याची हिंमत करु नये."
 
"संजय राजाराम राऊत, त्यांचे मालक आणि मालकीन मुलाला वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करतात. कुठल्याही अटीशर्ती न करता आम्हाला भाजपशी युती करायची आहे, अशा मागण्या करतात. कुठल्याही परिस्थितीत मोदीजींसोबत परत जाण्याची ईच्छा ठेवतात. तर दुसरीकडे, संजय राऊतांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सातत्याने भुंकायला सांगतात. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणं बंद न केल्यास त्यांच्या मालकाची आणि मालकाच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर आणेन की, दिवसरात्र औरंगजेब आठवेल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "ज्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडत त्यांचा द्वेष केला त्याच्याशी पंतप्रधान मोदींची तुलना करणं हा देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखं आहे. काँग्रेसच्या काळात जेवढी हिंदूंची मंदिरं अंधारात टाकली गेली त्या धार्मिक स्थळांचा विकास पंतप्रधान मोदींनी केला आहे. ५०० वर्षांपासून असलेली हिंदू समाजाची राम मंदिराची मागणीही त्यांच्याच काळात पूर्ण झाली आहे," असेही ते म्हणाले.
 
 

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121