स्टार्टअप म्हणजे भारताची संस्कृतीच : पंतप्रधान नरेंद्र मोदी
20-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशातील तरुणांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याचा निर्माण करण्याचा मार्ग आता निवडला आहे. स्टार्टअपद्वारे आता मोठे यश मिळवत असून ती आता भारताची संस्कृती झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. दिल्ली येथे आयोजित स्टार्टअप महाकुंभास संबोधित करताना ते बोलत होते.
स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व लहान शहरे करत आहेत. कृषी, वस्त्रोद्योग, औषध, वाहतूक, अवकाश, योग आणि आयुर्वेद यासह अनेक भारतीय स्टार्टअप्स अवकाश शटलच्या प्रक्षेपणासह अवकाश क्षेत्रातील 50 हून अधिक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसा लागतो ही मानसिकता स्टार्टअप्सने बदलली आहे.
देशातील तरुणांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याचा मार्ग निवडला आहे. भारत ही तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. यात 1.25 लाख स्टार्टअप आहेत, त्यामध्ये 12 लाख तरुणांचा समावेश आहे जे त्यांच्याशी थेट जोडलेले आहेत. परिणामी स्टार्टअप ही आता भारताची संस्कृती झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी केवळ विकसित भारतासाठीच नव्हे तर मानवतेसाठी नवोपक्रमाच्या संस्कृतीच्या या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्टार्टअप-20 अंतर्गत जागतिक स्टार्टअपसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या पुढाकाराचा उल्लेख केला जो स्टार्टअपला वाढीचे इंजिन मानतो. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमध्ये भारताचा वरचष्मा निर्माण झाला आहे.
Startups will play a pivotal role in making India the 3rd largest global economy. pic.twitter.com/kpcMXXo5cx
राष्ट्रीय क्वांटम मिशन, इंडिया एआय मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन यामुळे भारत जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. डिजिटल इंडियाने स्टार्ट-अप्सना चालना दिली आहे. देशात डिजिटल सेवांच्या विस्तारासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या विकासाचे नेतृत्व करणाऱ्या फिन-टेक स्टार्ट-अपसाठी यूपीआय आधारस्तंभ बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार भारत
अकराव्या स्थानावरून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात भारतातील तरुणांचे योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी आपल्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याची हमी पूर्ण करण्यासाठी स्टार्टअप्सची भूमिकादेखील अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. बजावल्या जाणाऱ्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, तरुणांशी संवाद साधल्याने त्यांना नवीन ऊर्जा मिळते.