“...तर आम्ही भाजपसोबत जाणार”; प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान

    02-Mar-2024
Total Views | 267

Prakash Ambedkar


मुंबई :
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली असली तरी त्यांच्यात काही आलबेल असल्याचे दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीकडून सतत मविआवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा सूचक इशारा दिला आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आम्ही सुधारणांवर विश्वास ठेवतो. आमचा राजकीय अजेंडा नाही. सामाजिक सुधारणा करता करता सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे घेणार आहोत. आताची सुधारणेची जी गरज आहे, ती म्हणजे जातीवर आधारित असलेले पुरोहित आहेत. यामध्ये समाजात समता आणि अधिकार आणावे लागेल. जातीवर आधारित पुरोहितशाही पुर्णपणे कायद्याने बंद व्हायला हवी. यासाठी हिंदु स्कुल ऑफ थिओलॉजी उभं करावं लागेल. त्यातून जो पुरोहित बाहेर पडेल त्याच्यामार्फतच देशात धार्मिक विधी केले जावेत. भाजप अशा प्रकारचा कायदा आणि सुधारणा करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणाच्या विचार करु शकतो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीची बैठक सुरु असताना आम्ही बाहेर बसलेलो असतो. आम्ही आमची यादी त्यांना दिलेली आहे. त्यांनी ठरवून आम्हाला कळवावं अशी परिस्थिती सध्या आहे. महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्यात त्यामध्ये फक्त तीन पक्ष बसतात. त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते आम्हाला बोलवतात. आम्ही वंचित आणि उपरे आहोत. त्यामुळे बैठकांमध्येही आम्ही उपरेच आहोत,” असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.




अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121