होय, मी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाची भेट घेतली : वसंत मोरे

    19-Mar-2024
Total Views | 66
 
Vasant More
 
पुणे : मी काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट या सर्वांकडे जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आहेत, असे वक्तव्य वसंत मोरेंनी केले आहे. वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा देऊन अनेक दिवस उलटले आहेत. त्यानंतरही त्यांनी अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, आता मी थोडा वेळ घेत आहे, असे ते म्हणाले आहे.
 
मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले की, "माझं पुढील राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे. परंतू, मी थोडा वेळ घेतोय कारण पुण्याची निवडणूक ही चौथ्या टप्प्यावर असून या निवडणूकीला अजून ५५ दिवस आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अजूनही बैठका सुरु आहेत. मी काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट या सर्वांकडे जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. अजून त्यांची पहिली यादीदेखील आलेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आणखी काही दिवस लागतील. त्यामुळे मी थोडा वेळ घेतोय."
 
हे वाचलंत का? - 'ती' बातमी खोटी! मी माघार..."; विजय शिवतारेंचं स्पष्टीकरण
 
ते पुढे म्हणाले की, "निवडणूक जिंकायची असेल तर योग्य रस्त्यावर असण्याची गरज आहे. मी सध्या योग्य मार्गावर असून त्यात नक्कीच यशस्वी होईल. मी वेळ घेतोय पण माझी वेळ चुकलेली नाही. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे," असेही ते म्हणाले आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121