समाजमाध्यमांवरील खोट्या मजकूरावर ‘आयसी४’ ची नजर

    18-Mar-2024
Total Views | 94
Indian Cyber Crime Control and Coordination Wing News

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.

केंद्रीयनिवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सूचनेनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ‘आयसी४’ विंगने समाजमाध्यमांवरून खोटा, दिशाभूल करणारा मजकूर आणि बनावट संदेश काढून टाकण्यासाठी सायबर तज्ञांची एक विशेष टीम तयार केली आहे. फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही समाजमाध्यमावरकोणतीही धोकादायक सामग्री पोस्ट केल्यास ‘आयसी४’ समाजमाध्यमप्रदात्याला ती सामग्री काढून टाकण्यास सांगणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘आयसी४’ ला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या धर्तीवर असे अधिकार बहाल केले आहेत.याशिवाय ‘आयसी४’ने फेक न्यूज संदर्भात एक विशेष प्रणाली देखील विकसित केली आहे, ज्याद्वारे देशभरातील कोणत्याही पोलीस ज्यांच्या परिसरात व्हायरल सामग्री आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.

 
अग्रलेख
जरुर वाचा
रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

रेल्वे उपकरणांच्या निर्यातीत भारताची झेप केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121