तिसऱ्या मुंबईतील विकासकामांना वेग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

    16-Mar-2024
Total Views | 39

cidco
 
 
मुंबई, दि. १५ :  अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या विकासकामांमुळे नवी मुंबईच्या पुढे तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीला राज्य सरकारकडून वेग आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्याच्या ग्रोथ इंजिनची नवी मुंबई ही अश्वशक्ती असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११२९ कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले.
 
शुक्रवार, दि.१५ मार्च रोजी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथून दूरदृष्टी प्रणालीद्वारे हा कार्यक्रम ऑनलाइन संपन्न झाला. या विशेष समारंभप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय बनसोडे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, विधान परिषद सदस्य आमदार रमेश पाटील व इतर विधानसभा सदस्य आणि झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहटा, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय
संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते. नावातच नाविन्य असणारे नवी मुंबई हे शहर नेहमीच नवनवीन प्रकल्प राबविण्यामध्ये आघाडीवर असून पर्यावरणपूरक विकास हे महाराष्ट्र शासनाचे धोरण असून आजही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबईने पायाभूत सुविधा, भूमिपुत्रांचा विकास आणि लोककल्याणकारी कामांवर भर दिला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
 
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रास्ताविकपर मनोगतात नवी मुंबईच्या विकासकामांचा धावता आढावा घेतला. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दर्जेदार सुविधापुर्ती सोबतच शहराच्या नावलौकिकात भर घालणारे 900 कोटींचे विशेष प्रकल्प सद्यस्थितीत सुरू असल्याची माहिती देत आयुक्तांनी 1129 कोटी रक्कमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत असल्याचे सांगितले. या लोकार्पण आणि भूमिपूजन झालेल्या प्रकल्प सुविधांमध्ये नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व ऐतिहासिक संग्रहालय, से.10 ए, ऐरोली शिलान्यास (रू. 14 कोटी), घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली – ऐरोली खाडीपूल बांधणे भूमिपूजन (493 कोटी) यांचा समावेश होता. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. याावेळी सिडको प्राधिकरणाच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग, भूमिपुन्न भवन, उलवे किनारी मार्ग, प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरूळ या प्रकल्पांचेही लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121