“खोटारडे केजरीवाल, CAA कायद्याविषयी अफवा पसरवू नका"

केजरीवाल यांच्या घरावर हिंदू निर्वासितांचा मोर्चा

    15-Mar-2024
Total Views | 34
 KEJRIWAL CAA
 
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केल्यानंतर विरोधी पक्षातील काही नेते अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांच्या याचं प्रोपोगेंडाला गृहमंत्री अमित शहांनी उत्तर दिले आहे. त्यातच पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा काढला.
 
सीएए लागू झाल्यास लोक बिनदिक्कतपणे देशात येतील, जसे स्वातंत्र्यानंतर झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा दावा केजरीवाल यांनी केला होता. केजरीवाल यांच्या दाव्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले, “दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर त्यांचा संयम सुटला आहे. त्यांना माहीत नाही की सर्व लोक भारतात आले आहेत आणि राहत आहेत. फक्त त्यांना अधिकार मिळालेले नाहीत. त्यांना अधिकार देण्याची ही बाब आहे."
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, "२०१४ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व देण्याची चर्चा आहे. एवढीच काळजी असेल तर बांगलादेश घुसखोरांबद्दल का बोलत नाही, रोहिंग्यांबद्दल का बोलत नाही. कारण ते व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळेच ते व्होट बँकेचे राजकारण करत आहेत."
 
 
अमित शहा यांना विचारण्यात आले की, अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, सरकार आपल्या लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही, मग ते कसे देणार? यावर अमित शहा म्हणाले की, केजरीवाल रोहिंग्यांसाठी कधीच काही बोलले नाहीत. ते केवळ बौद्ध, हिंदू, पारशी, ख्रिश्चन आणि शीख निर्वासितांना विरोध करत आहेत.
 
ते म्हणाले, “हे लोक फाळणीचा काळ विसरले आहेत. हे निर्वासित आपली करोडोंची संपत्ती सोडून इथे आले. आम्ही त्यांच्या समस्या का ऐकणार नाही? त्यांना इथे नोकरी आणि शिक्षण मिळत नाही. आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती का व्यक्त करणार नाही? देशाची फाळणी करण्याचा निर्णय त्यांचा नव्हता. काँग्रेसनेच हा निर्णय घेतला आणि त्यांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले. आता ते त्यांच्या आश्वासनावर ठाम नाहीत.”
 
एकीकडे अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर हे सर्व सांगितले. दुसरीकडे, हिंदू निर्वासितही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर हातात झेंडे घेऊन निदर्शने केली. यावेळी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. केजरीवाल यांची माफी मागावी अशी घोषणाबाजी करताना महिलाही दिसल्या. महिलांच्या हातात पोस्टर्स लिहिलेले दिसत होते - “लबाड केजरीवाल, सीएए कायद्यावर अफवा पसरवू नका, जनतेला सत्य सांगा.”
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121