मुस्लीम जोडप्याची घरवापसी! शाहनवाज बनला राहुल तर आर्शी बनली पूनम

    12-Mar-2024
Total Views | 54
 Muzaffarnagar
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक मुस्लीम जोडप्याने घरवापसी केली आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर शामलीचा रहिवासी शाहनवाज आता राहुल झाला आहे तर पत्नी अर्शीचे नाव पूनम झाले आहे. मूळची उत्तराखंडची असलेली पूनम पूर्वी हिंदू होती, तिने ३ वर्षांपूर्वी शाहनवाजशी लग्न केल्यानंतर अर्शी नावाने इस्लाम धर्म स्वीकारला.
 
रविवारी, दि. १० मार्च २०२४ झालेल्या या कार्यक्रमानंतर पती-पत्नीने अयोध्येतून आणलेली माती कपाळावर लावून तिलक लावला आणि भविष्यात नेहमी सनातन पद्धतीनुसार जीवन जगण्याचा संकल्प केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टिटवी पोलीस स्टेशन हद्दीतील मुझफ्फरनगरच्या बागरा येथील योग साधना यशवीर आश्रमात हा घरवापसी कार्यक्रम झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे ३ वर्षांपूर्वी पूनम गुर्जर नावाची मुलगी आणि शाहनवाजमध्ये प्रेम जडले.
 
 
पूनम ही मूळची उत्तराखंडमधील रुरकीची आहे तर शाहनवाज शामली जिल्ह्यातील कैराना येथील रहिवासी आहे. काही काळ भेट झाल्यानंतर दोघांनी इस्लामिक रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. पूनमनेही हिंदू धर्माचा त्याग करून तिचे नाव बदलून अर्शी ठेवले होते. लग्नानंतर पूनमला इस्लामिक पद्धती अजिबात आवडत नसल्याचं सांगण्यात येत आहे. ती लहानपणापासून शाकाहारी होती पण तिला मांस आणि मासे खायला सांगितले गेले.
 
या मतभेदामुळे शाहनवाजच्या घरात पूनमचे चांगले जमले नाही. तिला पुन्हा सनातनमध्ये परतायचे होते. यासाठी पूनमने पती शाहनवाजलाही समजावण्यास सुरुवात केली. तोपर्यंत घरगुती कलहामुळे पूनमने पती शाहनवाजच्या कुटुंबापासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांनी शाहनवाजलाही हिंदू पद्धती आवडू लागल्या. तो सनातनी पद्धतीने जगू लागला. घरवापसी करण्यासाठी या जोडप्याने मुझफ्फरनगरच्या स्वामी यशवीर आश्रमाशी संपर्क साधला.
 
घरवापसी कार्यक्रमादरम्यान, शाहनवाज आणि अर्शी यांनी वैदिक विधीनुसार हवन केले. दोघांनीही देवदेवतांची स्तुती केली. यावेळी दोघांनी अयोध्येहून आणलेल्या मातीचा टिळक लावला. धार्मिक पूजेनंतर अर्शीने पुन्हा तिचे मूळ नाव बदलून पूनम केले तर शाहनवाज राहुल झाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मनमाडमधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ भिशीच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहे. केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता, महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, तसेच एकमेकांशी संवाद वाढावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया, मनमाडमधील नोंदणी नसतानाही सर्वदूर प्रसिद्धीस पावलेल्या या अनोख्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121