"लोकांचं भलं करण्याची संधी असताना..."; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

    12-Mar-2024
Total Views |

Bawankule & Thackeray


नागपूर :
जेव्हा लोकांचं भलं करण्याची संधी होती तेव्हा तुम्ही घरात बसून होते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जेव्हा तुम्हाला लोकांचे भले करण्याची संधी तेव्हा तुम्ही घरात बसून होते. जनता समजूतदार ती असून उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस घराच्या बाहेर पडले. मात्र, त्यावेळी विरोधी पक्षात असणारे देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची काळजी घेत होते. देशाच्या विकासाची, प्रगतीची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पामागे जनता उभी राहील," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - उद्धव ठाकरेंच्या 'युझ ॲण्ड थ्रो' पॉलीसीमुळे निष्ठावान सोडून चालले
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या राजकारणाचा आधार जनतेत संभ्रम पसरविण्याचा आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. महायुतीमधील घटक पक्षांना पूर्ण सन्मान दिला जातो. महायुतीच्या ८० टक्के जागांचा निर्णय झाला असून उर्वरित जागांवर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. महायुतीमध्ये कोणताही ताणतणाव नसून सर्वांचे एकमत आहे. दिल्लीत महायुतीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यावरच उमेदवारीबाबत योग्य निर्णय होईल."
 
रोहित पवारांच्या चौकशीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "रोहित पवारांनी चौकशीला सहकार्य करावे. ज्याला कर नाही तर डर कशाला? चूक केली नसेल तर ईडीच्या नोटीसचे उत्तर साधेपणाने देता येते. चौकशीअंती निष्कर्ष निघेलच. मात्र ते सोडून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे," असेही ते म्हणाले.