राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्षाची दुर्दशा - आचार्य प्रमोद कृष्णम

    11-Mar-2024
Total Views | 35
 Rahul Gandhi INC
 
नवी दिल्ली :   काँग्रेसचे बहिष्कृत नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा नेते राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आचार्य म्हणाले, राहुला गांधी जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत काँग्रेसला कुणीही वाचवू शकत नाही. तसेच, काँग्रेसच्या दुर्दशेसाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती व्यक्ती म्हणजे राहुल गांधी, असेही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना आचार्य कृष्णम म्हणाले, दुसरीकडे प्रियंका गांधी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. त्याचबरोबर त्यांना पक्षात मानदेखील मिळत नाही. प्रियंका गांधी या पक्षाच्या सर्वात लोकप्रिय नेत्या असल्या तरी त्यांना कुठलीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही, असेही आचार्य कृष्णम यावेळी सांगितले.



हे वाचलंत का? >>>   बाळासाहेबांचा झंझावात ज्या शिवतीर्थावर गर्जायचा तिथे होणार राहुल गांधींची सभा! उद्धव ठाकरेही होणार सहभागी


कल्कि धामचे पीठाधीश्वर कृष्णम यांची फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यावेळी आचार्य यांनी राहूल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, लहान मूल काहीही बोलू शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. यावर बोलताना आचार्य म्हणाले, रामाला विरोध करणाऱ्यांसोबत कोणालाच राहायचे नाही. तसेच, राम मंदिराचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने हा राम आणि सनातन विरोधी पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे, असेही आचार्य म्हणाले.

ते पुढे म्हणाले, काँग्रेस हे बुडणारे जहाज असून त्या जहाजात कोणीही राहू शकणार नाही. ज्यांचे कॅप्टन राहुल गांधी आहेत, ते उड्या मारून पळत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावरही अनेक नेते पक्ष सोडतील, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जात आहे. राहुल गांधींचे सेवक त्यांचा अपमान करत आहेत, काँग्रेस पक्ष हा बड्या नेत्यांचा पक्ष होता, आता तो सेवक चालवत आहेत, अशा शब्दांत आचार्य कृष्णम यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121