३१ वर्षांपासून बंद असलेल्या महादेव मंदिरात पूजा! कट्टरपंथीयांनी दिल्या आक्षेपार्ह घोषणा
10-Mar-2024
Total Views |
जयपूर : राजस्थानमधील हवामहल, जयपूर येथील भाजप आमदार आचार्य बालमुकुंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचे कारण म्हणजे महाशिवरात्रीला दीर्घकाळ बंद असलेल्या पुरातन शिवमंदिरात जाऊन पूजा करणे. हे मंदिर मुस्लिमबहुल भागात आहे. त्यांनी मंदिराला लटकलेले कुलूप करवतीने कापून आत प्रवेश केला.
पूजेदरम्यान कट्टरपंथी जमावाने आक्षेपार्ह धार्मिक घोषणा दिल्या. रिपोर्ट्सनुसार, हे प्राचीन मंदिर जयपूरच्या आदर्श नगर भागात आहे. येथून काँग्रेसचे आमदार रफिक खान विजयी झाले आहेत. आचार्य बालमुकुंद असा दावा करतात की पूर्वी मंदिराच्या आसपास हिंदू समाजाची मोठी लोकसंख्या होती, जे विविध कारणांमुळे तेथून निघून गेली.
अशा स्थितीत आचार्य बालमुकुंद मंदिरांचे जतन ही आपली जबाबदारी मानून या मंदिरात पोहोचले. मंदिराच्या गेटला मोठे कुलूप लटकले होते. ते मंदिरही बराच काळ उघडले नव्हते. काही वेळ चावी न मिळाल्याने आमदाराने करवतीने मंदिराचे कुलूप कापले. मंदिराच्या आत गेल्यावर तिथे खूप अस्वच्छता दिसली. अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नव्हती.
धार्मिक स्थळाच्या या दुर्दशेवर भाजप आमदार चांगलेच संतापले. रफिक खान मंदिरांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार आचार्य बालमुकुंद यांनी त्यांच्या समर्थकांनी मंदिराची स्वच्छता करून महादेवाची पूजा केली. एका स्थानिक व्यक्तीचे म्हणणे आहे की हे मंदिर १९९३ पासून म्हणजेच ३१ वर्षांपासून बंद आहे. आचार्य बालमुकुंद जेव्हा भगवान शिवाची पूजा करत होते तेव्हा कट्टरपंथीयांनी धार्मिक घोषणा दिल्याचा आरोप आहे.