अनेक हिंदी ऐतिहासिक मालिकांचे लेखन करणारे लेखक आणि मालिका चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखलणारे मेराज जैदी यांचे दु:खद निधन
मुंबई : ऐतिहासिक मालिकांचे लिखाण करणारे ज्येष्ठ लेखक मेराज जैदी (Meraj Zaidi) यांचे निधन झाले आहे. १ मार्च २०२४ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेराज जैदी यांची प्रयागराज येथील दांदूपुर भागातील आपल्या राहत्या प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि तीन मुले असा परिवार आहे.
मेराज जैदी यांनी 'वीर शिवाजी', 'झॉंसी की रानी' मालिकेचे लेखन केले होते. याशिवाय 'शोभा सोमनाथ की', 'आपकी अंतरा', 'राजा का बाजा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे संवाद लेखन आणि कथालेखनाची जबाबदारी देखील सांभाळली होती. याशिवाय मेराज यांची ख्यातनाम दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेता म्हणूनही ओळख होती.
जैदी यांनी ‘गोंगर २’ हा हॉलिवूडपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी अनेक मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. तसेच, हबीब तनवीर यांच्यासोबत त्यांनी आगरा बाजार, मृतक बिहारी लाल हाजिर हों, शहर में कर्फ्यू, रामचरन चोर असे अनेक लोकप्रिय कार्यक्रम केले होते.