‘वीर शिवाजी’ मालिकेचे लेखक मेराज जैदी काळाच्या पडद्याआड

    01-Mar-2024
Total Views | 29
अनेक हिंदी ऐतिहासिक मालिकांचे लेखन करणारे लेखक आणि मालिका चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखलणारे मेराज जैदी यांचे दु:खद निधन
 

Meraj Zaidi 
 
 
मुंबई : ऐतिहासिक मालिकांचे लिखाण करणारे ज्येष्ठ लेखक मेराज जैदी (Meraj Zaidi) यांचे निधन झाले आहे. १ मार्च २०२४ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेराज जैदी यांची प्रयागराज येथील दांदूपुर भागातील आपल्या राहत्या प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि तीन मुले असा परिवार आहे.
 
मेराज जैदी यांनी 'वीर शिवाजी', 'झॉंसी की रानी' मालिकेचे लेखन केले होते. याशिवाय 'शोभा सोमनाथ की', 'आपकी अंतरा', 'राजा का बाजा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे संवाद लेखन आणि कथालेखनाची जबाबदारी देखील सांभाळली होती. याशिवाय मेराज यांची ख्यातनाम दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेता म्हणूनही ओळख होती.
 
जैदी यांनी ‘गोंगर २’ हा हॉलिवूडपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी अनेक मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. तसेच, हबीब तनवीर यांच्यासोबत त्यांनी आगरा बाजार, मृतक बिहारी लाल हाजिर हों, शहर में कर्फ्यू, रामचरन चोर असे अनेक लोकप्रिय कार्यक्रम केले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121