‘कलम ३७०’ हटवण्यापुर्वी जम्मू-काश्मिरच्या राज्यपालांची फॅक्स मशिन खरंच बंद पडलं होतं का?

    24-Feb-2024
Total Views | 57

omar and mehbuba 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी एक महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय होता जम्मू- काश्मिरमधूल कलम ३७० हटवण्याचा. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवण्यात आले. ही संबंध घटना काय होती? हा निर्णय कसा घेतला गेला आणि त्यासाठी काय प्रयत्न केले गेले या सर्व गोष्टी आदित्य जांभळ दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दाखवलेल्या सर्व घटना सत्य आहेत. यापैकीच एक घटना म्हणजे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे फॅक्स मशिन बिघडल्याची घटना.
 
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात जम्मू-काश्मिरमधील राज्यपालांच्या कार्यालयातील फॅक्स मशीन बंद पडल्याची एक घटना दाखवण्यात आली आहे. तो किस्सा नेमकी काय आहे जाणून घेऊयात. तर, जम्मू-काश्मिरमधून ‘कलम ३७०’ जरी ५ ऑगस्ट २०१९ रोजी हटवले गेले असले तरी त्याची पुर्वतयारी ही चार ते पाच वर्षांपासून सुरुच होती. तर झाले असे की जम्मू-काश्मिकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी पीडीपी पार्टीच्या मेहबुबा मुफ्ती आणि आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे ओमर अब्दुल्ला यांनी एकत्रित येत सरकार स्थापन करण्याची योजना आखली होती. यासाठी दोघांनी एकत्रित येत पत्र लिहून त्यावर आवश्यक स्वाक्षऱ्या घेऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कार्यालयात फॅक्सने ते पत्र पाठवले होते, परंतु, त्यावेळी राज्यपालांच्या कार्यालयातील फॅक्स मशील चालत नसल्याकारणाने ते पत्र राज्यपालांपर्यंत पोहोचू शकले नाही आणि मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांचे सरकार काही स्थापन झाले नाही. आणि कालांतराने यशस्वीरित्या जम्मू- काश्मिरमधून ‘कलम ३७०’ हटवण्यात यश आले होते. हिच सत्य घटना आर्टिकल ३७० या चित्रपटाच दाखवण्यात आली आहे.
 
अभिनेत्री यामी गौतम आणि प्रिया मणि यांची प्रमूख भूमिका असलेल्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर यांनी देखील महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
चांदवडमध्ये साकारणार अहिल्यादेवींचे शिल्प

चांदवडमध्ये साकारणार अहिल्यादेवींचे शिल्प

“चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 300 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121