“अयोध्येत राम मंदिर उभारुन तुम्ही ५०० वर्षांचा इतिहास”, शिल्पा शेट्टीचे पंतप्रधानांसाठी खास पत्र

    14-Feb-2024
Total Views |

shilpa shetty 
 
मुंबई : अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे शुभकार्य संपन्न झाले होते. याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहित त्यात, “तुम्ही ५०० वर्षांचा इतिहास बदलला असून कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न साकार केले आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
 
शिल्पाने पत्रात लिहिले आहे की,''आदरणीय मोदी जी, काही लोकं इतिहास वाचतात, काही लोकं इतिहासातून शिकतात, परंतु तुमच्यासारखी लोकं इतिहास बदलतात.. तुम्ही राम जन्मभूमिचा पाचशे वर्षांचा इतिहास बदलून दाखवला. मनापासून तुमचे आभार... या शुभकार्यासोबत, प्रभु श्री राम यांच्या नावासोबत, तुमचं नाही कायमचं जोडलं गेलं आहे. नमो राम, जय श्री राम!”
 
 
 
दरम्यान, २२ जानेवारी रोजी कलासृष्टी अयोध्येत रामललाच्या स्वागतासाठी हजर होती. यात अरुण गोविल, सुनील लाहिरी, दीपिका चिखलिया, अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित नेने, राजकुमार हिरानी, कैलाश खेर, राम चरण, मनोज जोशी आणि इतर कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121